ठिबक सिंचन योजना/ तुषार सिंचन
🙏 नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत, ठिबक सिंचन योजना, त्याच्या मधे तुम्हाला तुषार सिंचन या कंम्पनी चे ठिबक मिळते. त्या योजनेचा उद्देश एवढेच आहे कि पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याचि अधूनिक पध्दत म्हणजे ठिबक सिंचन. या पध्द्तीत, जमिनित पाणी जीरण्याचा वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेबने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६०% टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
तुषार सिंचन ( ज्यात पाणी शिपडनारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लाॅन्स, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करन्यासाठी वापरली जाते. ते थंड कारन्यासाठी आणि वायुच्या धुळ नियत्रणासाठी देखिल वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्या प्रकारे नियत्रीत पध्द्तीने पाण्याचा वापर करण्याचा मार्गे आहे. पाणी एका नेटवर्कव्दारे वितरीत केले जाते ज्या मध्ये पंप, वॉल्व्ह, पाईप आणि स्पिकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औधोगिक आणि क्रुषी वापरासाठी केला जाउ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपव्दारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फ़िरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.
• उमेदवाराची पात्रता.
१) शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
२) शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८- अ प्रमानपत्र आसणे आवश्यक आहे.
३) शेतकरी SC व ST जातीवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
४) शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याचा पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच अवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विज बिलाची ताजी प्रत (पावती) सदर करावी लागेल.
५) शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यास येईल.
६) सुक्ष्म सिंचन प्रणाली फ़क्त कंपनीच्या प्रतिनिधीनि तयार केलेलि असावी.
७) जर लाभरत्याने २०१६-१७ च्या आधी या घटकातर्गत कोणत्याहि विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यस त्याला पूढील १० वर्ष त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही, आणि जर लाभार्थ्यांने २०१६-१७ च्या नंतर या घटकातर्गत कोणात्यही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यस त्याला पूढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
८) शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिक्रूत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड काराव्यात.
• आवश्यक कागदपत्रे.
१) ७/१२ प्रमाणपत्र.
२) ८-ए प्रमाणपत्र.
३) विज बिल.
४) खरेदी केलेल्या संचाचे बिल.
५) पूर्वसंमती पत्र.
• अनुदान स्वरूप.
केद्र शासनाच्या मार्गेदर्शक सुचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल :-
१) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५%
२) इतर शेतकरी – ४५%
• ऑनलाईन अर्ज कसा करायचा 👇.