Category: Blog

फळबाग लागवड अनुदान योजना / भाऊसाहेब फुंडकर योजना

फळबाग लागवड अनुदान योजना / भाऊसाहेब फुंडकर योजना

.    सन २०१८-१९ पासून राज्यत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीन रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येनार आहे. सदर योजना शासनाच्या क्रूषी विभागामार्फत राबविली जात आहे.

  या योजनेत भाग घेण्यसाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हेक्टर. क्षेत्र मार्यदेत लाभ घेऊ शकतो.

   योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% , दुसऱ्या वर्षी ३०% ,आणि तीसऱ्य वर्षी २०% , अश्या तिन वर्षात देण्यात येनार असुन शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यसाठी लागवड केलेल्या झाडचे जीविताचे प्रमाण बागायती झाडासाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी जल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे.

   अल्प, अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यंग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे. महात्मा गाँधी राष्टीय ग्रामीन रोजगार हमी योजनेतर्गत पात्र लाभार्थना प्रथम त्या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे, उर्वरीत क्षेत्रासाठी ( वरील क्षेत्र मर्यादेच्या आधीन राहून) लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.

• उमेदवाराची पात्रता. 

१) लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थींना देय नाही.

२) लाभार्थ्यांस फ़ळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे.

३) शेतकऱ्यास स्वत:च्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. सायुक्त मालकी असल्यास इतर खातेदाराचे संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हीश्याच्या मार्यदेत लाभ घेता येईल.

४) सर्व प्रवर्गअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुंटुबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल व त्यनांतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. ( कुटुंबाची व्याख्या : पती, पत्नी, व अज्ञात मुले)

५) परंपरगत वन निवासी (वन आधीकार मान्यता) आधीनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यात पात्र आहे.

६) ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास, कुळाची संमती अवश्यक आहे.

 

ठिबक सिंचन योजना/ तुषार सिंचन

ठिबक सिंचन योजना/ तुषार सिंचन

          🙏 नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत, ठिबक  सिंचन योजना, त्याच्या मधे तुम्हाला तुषार सिंचन या कंम्पनी चे ठिबक मिळते. त्या योजनेचा उद्देश एवढेच आहे कि पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याचि अधूनिक  पध्दत म्हणजे ठिबक सिंचन. या पध्द्तीत, जमिनित पाणी जीरण्याचा वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेबने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६०% टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.

      तुषार सिंचन ( ज्यात पाणी शिपडनारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लाॅन्स, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन  करन्यासाठी वापरली जाते. ते थंड कारन्यासाठी आणि वायुच्या धुळ नियत्रणासाठी देखिल वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्या प्रकारे नियत्रीत पध्द्तीने पाण्याचा वापर करण्याचा मार्गे आहे. पाणी एका नेटवर्कव्दारे वितरीत केले जाते ज्या मध्ये पंप, वॉल्व्ह, पाईप आणि स्पिकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औधोगिक आणि क्रुषी वापरासाठी केला जाउ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपव्दारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फ़िरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

•  उमेदवाराची पात्रता. 

१)  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.

२) शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि ८- अ प्रमानपत्र आसणे आवश्यक आहे.

३) शेतकरी SC व ST जातीवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

४) शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याचा पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच अवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विज बिलाची ताजी प्रत (पावती) सदर करावी लागेल.

५) शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यास येईल.

६) सुक्ष्म सिंचन प्रणाली फ़क्त कंपनीच्या  प्रतिनिधीनि तयार केलेलि असावी.

७) जर लाभरत्याने २०१६-१७ च्या आधी या घटकातर्गत कोणत्याहि विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यस त्याला पूढील १० वर्ष त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही, आणि जर लाभार्थ्यांने २०१६-१७ च्या नंतर या घटकातर्गत कोणात्यही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यस त्याला पूढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.

८) शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिक्रूत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड काराव्यात.

• आवश्यक कागदपत्रे. 

१)  ७/१२ प्रमाणपत्र.

२)  ८-ए प्रमाणपत्र.

३)  विज बिल.

४)  खरेदी केलेल्या संचाचे बिल.

५)  पूर्वसंमती पत्र.

• अनुदान स्वरूप. 

केद्र शासनाच्या मार्गेदर्शक सुचनांनुसार सादर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेल :-

१) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५%

२) इतर शेतकरी – ४५%

• ऑनलाईन अर्ज कसा करायचा 👇. 

 

 

 

 

 

सेंद्रिय शेती (Organic Farming)

            नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत सेंद्रिय शेती कशा प्रकारे केली जाते. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते करणे व पारंपरिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत पद्धतीने केलि जाणारी शेती. सेंद्रिय शेती करताना रसायनाचा न करता केवळ शेतातिल पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांती च्या आधी शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे.जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढुन पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या आरोग्यस पोषक असणाऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.

• सेंद्रिय शेती का केली पाहिजे. 

शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर अतिरीक्त झाला आहे. ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे जमिनीत विषारी घटक साचले आहेत. आणि मानवी आरोग्यावर त्यांचा दुष्परिणाम होत आहे. सेंद्रिय शेतीची गरज खालील कारणांमुळे निर्माण झाली आहे ::-

 1} पर्यावरणाचे रक्षण न करणे ::- रासायनिक शेतीमुळे जमिनीची आणि पाण्याची गुणवत्ता खराब होते. आणि सेंद्रिय शेती पर्यावरणाचा समतोल राखते.

2} जमिनीची सुपीकता टिकवणे ::-  सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची वाढ होते. ज्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते.

3} आरोग्यास पोषक अन्नधान्य ::- रसायनांपासून मुक्त अन्नधान्य शरीरासाठी आरोग्यदायी असते. आणि त्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यकआहे.

4} जमिनीतील दिर्घकालीन टिकाव ::- सेंद्रिय शेती जमिनीच्या पोषणमूल्यांमध्ये वृध्दी करते, ज्यामुळे भविष्यातही उत्पादन टिकून राहते.

• सेंद्रिय शेतीचि वैशिष्ट्ये. 

 1) नैसर्गिक खते व जैविक संसाधनांचा वापर ::-  सेंद्रिय शेतीत गोमुत्र, शेणखत, कंपोस्ट, हरीत खते, आणि गांडूळ खताचा वापर होतो.

२) पुनर्वापर व पुननिर्मिती ::- शेतातिल कचरा व अवशेष कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पुनर्वापर केला जातो.

३) पिक फेरपालट ::- जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी विविध पिकांची फेरपालट केली जाते.

4) जजैविक किटकनाशके ::-  झाडांच्या पानांपासून , निम व इतर अनेक वनस्पतींच्या आर्कांपसुन तयार केलेले जैविक कीटकनाशके वापरले जाते.

5) जलसंधारण व मृदा संरक्षण ::- सेंद्रिय शेतीत पाणी साठवणे आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यावर भर दिला जातो.

• ससेंद्रिय शेतीचे फायदे. 

– आरोग्यासाठी फायदेशीर अन्न : रसायनमुक्त अन्नामुळे आरोग्य सुधारते.

– पर्यावरणपूरक : रासायनिक शेती च्या तुलनेत सेंद्रिय शेतीत प्रदुषण कमी होते.

– जमीनीची सुधारणा : जैविक घटकांचा वापर केल्याने जमिनीची गुणवत्ता सुधारते.

– जैवविविधतेचे संवर्धन : किटक, पक्षी, आणि इतर जैविक घटकांना नैसर्गिक अधिवास मिळतो.

– खर्च कमी : रासायनिक खते व कीटकनाशकांवरचा खर्च कमी होतो. इतर.

• सेंद्रिय शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पध्दती.

– कंपोस्ट तयार करणे :  शेतीतील सेंद्रिय कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो.

– हरीत खताचा वापर : मुग, उदिड, साळी  यांसारख्या  हरीत खतांचा उपयोग मातीच्या पोषणासाठी केला जातो.

– जैविक किटकनाशके तयार करणे : निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गोमुत्र अर्क, यांचा कीड नियंत्रणासाठी उपयोग केला जातो.

– शेतीतील जनवारांचा समावेश : जनवारांचे शेण व मुत्र खत म्हणून वापरण्यात येते, तसेच जनवारांच्या साहाय्याने शेताची नांगरणी केली जाते.

सेंद्रिय शेती ही केवळ शेतीची पध्दत नाही, तर ती पर्यावरण, मानवी आरोग्य, आणि निसर्गसंवर्धनाचा मार्ग आहे. रासायनिक शेती च्या परीणांमांपासुन पर्यावरण आणि मानवजात वाचवण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्यांना प्रशिक्षण देणे, आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, आणि सेंद्रिय उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेती च्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जग निर्माण करणे शक्य आहे.

 

 

क्रुषी यांत्रिकीकरण योजना. ट्रॅक्टर /अवजारे.

                         🙏नमस्कार शेतकरी मित्रानों, आज आपण बागणार आहोत क्रुषी यांत्रिकीकरण योजना. क्रुष यंत्र/ आवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्याक्षिक व्दारे सहभागीदारांना क्रुषी यंत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे. तर मित्रानो या योजनाचा उद्देश एवढेच कि ,जेथे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी आहे अशा शेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्यांपर्यत क्रुषी यांत्रिकीकरणाच लाभ पोहचविणे. प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाव्दारे सहभागीदारमद्ये जागरुक्त निर्मान करने हाच आहे.

• उमेदवार ची पात्रता . 

१) शेतकऱ्याचे आधार कार्ड असने अनिवार्य आहे.

२) शेतकर्यांकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.

३) शेतकरी अनु, जाती. अनु, जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.

४) फक्त एकाच औजारसाठी अनुदान देय राहिल म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र /अवजार.

५) कुटुंबातील व्यक्तिच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलीत औजारसाठी लाभ मिळन्यास पत्र असेल परंतु ट्रॅक्टर आसल्यचा पुरावा सोबत जोडने अवश्यक आहे.

६) एकाद्या घटकासाठी / औजारसाठी  लाभ घेतला असल्यास त्याचा घटक/ औजारसाठी पुढील १० वर्ष अर्ज करता येणार नाही पारंतु  इतर औजारसाठी अर्ज करता  येईल.

• आवश्यक कागदपत्रे. 

१) आधार कार्ड.

२) ७/१२ उतारा.

३) स्वयं घोषणपत्र.

४) पूर्वसंमती पत्र.

५) ८ अ दाखला.

६) जातीचा दाखला (अनु जाती व, अनु जमाती साठी) .

७) खरेदी करवयाच्या अवजारांचे कोटेशन व केंद्र    शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी आहवाल .

• ऑनलाईन अर्ज कसा करायंचा. 

• योजनेचे स्पष्टीकरण. 

तर मित्रांनो महा डी बि टी पोर्टल अंतर्गत, क्रुषी यंत्र अवजारांच्या खरेदी साठी अर्थसाय्य ट्रॅक्टर या घटकासाठी , तर या मधे while- driwe हा एक मुख्य प्रकार आहे, त्या मधे two- whill driwe आणि four whill driwe हे दोन प्रकार येतात. या दोन्ही प्रकांरमधे अनुदान (subsidy policy) सारखेच असते. या मधे बगा तुम्ही जर 8 Hp ते 20 Hp परेंतचा ट्रॅक्टर खरेदी करत असाल तर तुम्हाला ७५,०००/- रु अनुदान ( Subsidy policy) मिळते, आणि जर तुम्ही Sc, St, अल्पभूदारक शेतकरी व महिला शेतकरी या कॅटेगरी मधुन अर्ज सादर करता तर तुम्हाला १०,००००/- रु अनुदान ( subsidy policy) मिळते. त्या नंतर तुम्ही जर 20Hp ते 40Hp मधे ट्रॅक्टर घेता तर् तुम्हाला अनुदान देखिल वाढवून मिळते,. तुम्ही जेवडे जास्त HP वाढवुन ट्रॅक्टर घेता , तेवडे तुम्हाला अनुदान देखिल जास्त मिळते. आणि या अनुदान (subsidy policy) मधे याच्या वेतिरिक्त कोणत्याही जास्त स्वरुपात अनुदान रक्कम मिळत नाही.

धन्यवाद 🙏.